मा. तात्यासाहेबांना समाजातील अज्ञान अंधकार दूर व्हायला हवा होता. समता, बंधुत्व, सहानभुती, जिव्हाळा, प्रेम हे सार्या समाजामध्ये असावे ही त्यांची तीव्र उत्कट इच्छा असे. प्रेमाला ते सार्या संस्कृतीचा सारांश मानत. त्यांच्या प्रेरणेने आणि इष्टमित्रांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या ह्या प्रतिष्ठानला आपण स्वत: आणि आपल्या स्नेह्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले, तर त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणता येतील. त्यासाठी हे आपल्याला स्नेहपूर्ण आवाहन, आपण प्रतिसाद द्याल ह्या खात्रीने केलेलं ! |